सी बी डी बेलापूर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

वेध ताज्या घडामोडींचा/दि१८,नवीमुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे महत्व नागरिकांना दिवसेंदिवस समजायला लागल्याने ठिकठिकाणी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसत आहेत. सी. बी. डी. बेलापूर मध्ये समाजिक कार्यकर्ते अशोक गुरखे यांनी आणि त्यांच्या कार्यर्कत्यांनी एकत्र येऊन कन्झुमर्स को-ऑप सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विंकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते ,मात्र त्याबदल्यात झाडे लावले जात नाही. यामुळे  पर्यावरणातील  तापमान वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढत चालला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणत जेवढे शक्य होईल तेवढे वृक्ष लावले गेले पाहिजेत. तरच भविष्यात आपण चांगला श्वास घेवू शकतो.  त्यामुळे आपण जेवढे या या पृथ्वीचे नुकसान केले आहे. ते वृक्षलागवड करूनच भरून काढले जावू  शकते यासाठी वृक्षलागवड मोहीम करणे आवश्यक असल्याचे समाजिक कार्यकर्ते अशोक गुरखे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *